ऐतिहासिक,सांस्कृतिक आणि
सामाजिक वारसा
आहे फार मोठा महाराष्ट्र
देशाच्या संस्कृतीचा ठसा
संत महंत,ऋषी मुनिंची
पाऊले पडली इथेच संतांची
शूरवीरांचा त्याग, पराक्रम
आणि आहे परंपरा देशप्रेमाची
सर्वधर्मसमभावाचे इथेच
केले आहे पालन
शिवरायांनी केले हिंदवी स्वराज्य
आणि रयतेचे राज्य स्थापन
लढा उभारून इंग्रजांविरुद्ध
प्राण देउनी बनले महान देशभक्त
कष्ट यातना अनंत भोगल्या
सांडले त्यांचे देशासाठी रक्त
पावन स्पर्शाने उपकृत झाली
संतांची मांदियाळी इथेच रुजली
समाजसुधारकांच्या प्रबोधनाने
महाराष्ट्र मराठी मने जपली
गीत,पोवाडे,कविता
रचूनी
महाराष्ट्राच्या मातीचे वर्णन
मराठी मातीचा ललाटी टिळा
थोरवी गायली करुनि कीर्तन
किती गाऊ मराठीचा गोडवा
वैभवशाली इतिहासाचा परडा
प्रगतीचे उंच शिखर गाठले
चढूनि विविध क्षेत्राच्या कडा
किरण पेठे, नागपूर

Comments
Post a Comment